Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी: अहमदनगर जिल्ह्यातील ९० हजार शेतकरी अडचणीत; पीएम किसानचे पैसे मिळणार नाहीत

Webdunia
शनिवार, 17 डिसेंबर 2022 (08:41 IST)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 90 हजार 113 लाभार्थ्याची बँक खाती आधार संलग्न करणे प्रलंबित आहेत. केंद्र शासनाकडून योजनेचा 13 वा हप्ता वितरणापूर्वी लाभार्थीची बँक खाती आधार संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आधार संलग्न केलेल्याच बँक खात्यांमध्ये यापुढील लाभ वितरीत केला जाणार आहे. म्हणजेच, आधारला बँक खाते न जोडणाऱ्या 90 हजार 113 शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचे दर महा २ हजार रुपये मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
 
पीएम किसान योजनेच्या लाभार्थीस व्यक्तीश: संबंधित बँकेत जाऊन स्वतःचे बँक खाते आधार संलग्न करून घेणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत बँक खाते आधार संलग्न करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Toy Train माथेरानला जाण्यासाठी प्रवाशांची प्रतीक्षा संपणार, नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार!

आमदार मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना धारेवर धरले, कोविड काळात BMC मधील भ्रष्टाचाराचा संपूर्ण हिशेब मागितला

आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात, लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी म्हणाले- राजकारण करू नका, मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवा

महाविकास आघाडीत सर्व जागांवर एकमत, 25 जागांवर घेणार हायकमांड अंतिम निर्णय

पुढील लेख
Show comments