Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करोनामुळे नव्हे तर सर्व मृत्यू नैसर्गिक: प्रकाश आंबेडकर

Webdunia
बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:07 IST)
देशात दररोज हजारोंच्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून येत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच दावा केला आहे. आंबेडकर यांच्याप्रमाणे करोनामुळे मृत्यू होत नसून सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत. 
 
करोना आहे, यावरही विश्वास नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं. त्यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. 
 
त्यांनी म्हटले की जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहेच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. परंतू सध्याच्या परिस्थितीत करोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत.
 
आंबेडकर म्हणाले की करोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा पुरावा काय कारण? कोणाचीही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का? ज्यात करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असेल. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments