Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐतिहासिक शाळांच्या विकास योजनेत प्रतापसिंह हायस्कूल

Webdunia
गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (15:03 IST)
मागील अनेक वर्षापासुन दुर्लक्षित असणाऱया व ऐतिहासिक असे महत्व असणाऱया सातारा शहरातील प्रतापसिंह हायस्कुलची दखल मंत्रालयाकडुन ही घेतली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असल्याने ज्या ज्या महापुरूषांनी देश उभारणीत बहुमोल योगदान दिले त्यांच्या जन्मगावच्या शाळांचा विकास करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. याअंतर्गत राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात पहिल्या टप्यात राज्यातील 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हय़ातील तीन शाळांचा समावेश करण्यात आला असुन यामध्ये नायगावच्या (ता. खंडाळा) सावित्रीबाई फुले शाळा व कटगुण (ता. खटाव) येथील शाळेचा समावेश आहे.
 
 सामाजिक सलोखा, लोकशाही अन मानवतावाद या मूलमंत्रा सोबतच देशाच्या स्वातंत्र्यात योगदान असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांच्या जन्मगावांचा या प्रस्तावात समावेश आहे. या महापुरुषांच्या जन्मगावच्या शाळा आधुनिक होतील. सुसज्ज इमारती असतील. या महापुरूषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय असेल, असा या उपक्रमामागचा हेतू आहे. या सर्व शाळा ऐतिहासिक असल्याने भविष्यातील नव्या पिढीसमोर आपापल्या गावातील महापुरुषांचा आदर्श समोर उभा राहून राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणारे प्रोत्साहन मिळावे यासाठी या शाळांचा विकास करण्यात येणार आहे. ही संकल्पना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची आहे. प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मान्यता दिली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments