Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिपळूणमधील महापुराचा प्राथमिक अहवाल तयार, पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला नाही

Webdunia
शनिवार, 31 जुलै 2021 (22:46 IST)
राज्यात मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातल्याचं दिसून आलं. यामध्ये  पुरग्रस्त भागांपैकी एक असलेल्या चिपळूण शहरास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती. त्यानंतर आता तेथील अहवाल समोर आला आहे. चिपळूणमधील  पूर हा मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती आणि कोळकेवाडी धरणातील विसर्ग यामुळेच आला असल्याचा प्राथमिक अहवाल आता पाटबंधारे विभागाने शासनाकडे सादर केला आहे. 
 
जगबुडी नदीचं पाणी वाशिष्ठी नदीला मिळालं व समुद्रात भरती असल्याने, पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने तिथे फुगवटा निर्माण झाला. त्यामुळेच चिपळूण शहरात पूर आला असल्याचं अहवालात सांगितलं गेलं आहे. याशिवाय कोळकेवाडी धरणामधूनही ८ हजार ४०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याची नोंद देखील या अहवालात करण्यात आलेली आहे. या अहवालात पूराची कारण व त्याबाबतच्या उपाययोजना देखील सूचवण्यात आलेल्या आहेत.
 
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती, अशा तीन घटना एकाच कालावधीत घडल्यामुळे चिपळूण शहर शब्दश: जलमय झाल्याचं पहायला मिळालं. चिपळूण मुख्य बाजारपेठेत १० फूटापेक्षाही जास्त पाणी साचले होते. शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले, काही ठिकाणी पहिल्या मजल्यांवरील घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरले. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले. २६ जुलै २००५ रोजी च्या महापुरापेक्षाही निसर्गाचा मोठा प्रकोप चिपळूणकरांनी यंदा अनुभवला असं सांगितलं जात आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments