suvichar

पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर हल्लबोल, जर मालेगावचे आरोपी निर्दोष होते तर..

Webdunia
शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 (08:26 IST)
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारला विचारले आहे की जर सर्व आरोपी निर्दोष होते तर २०१४ मध्ये त्यांचा खटला का रद्द करण्यात आला नाही?

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष ठरवले. या निकालावर ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की जर या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष होते तर २०१४ मध्ये खटला का बंद करण्यात आला नाही.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण  म्हटले आहे की जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक निर्दोष आहे तर तुम्ही २०१४ मध्ये त्यांचा खटला का रद्द केला नाही? तुम्ही न्यायालयाला का सांगितले नाही की या प्रकरणात काहीही तथ्य नाही. तुम्ही ११ वर्षे हा खटला लढला आणि आज तुम्हाला स्वप्न पडले की लोक दहशतवादी नाहीत. दोषींना शिक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे.  

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्या लोकांविरुद्ध एटीएसने या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता त्याच लोकांविरुद्ध खटला चालवण्यात आला होता. जर देवेंद्र फडणवीस यांना अचानक स्वप्न पडले की हे लोक दहशतवादी घटनेत सहभागी नाहीत, तर त्यांनी हा खटला आधीच रद्द करायला हवा होता. चव्हाण म्हणाले की, या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की एनआयए पुरावे योग्यरित्या सादर करू शकले नाही, म्हणूनच या लोकांना शिक्षा झाली नाही. पण, या दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय म्हणाल? २०१४ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खटला का बंद केला नाही? असे देखील ते यावेळी म्हणाले.
ALSO READ: झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांचे ठाण्यात पोस्टर लावून मनसेने प्रतिक्रिया दिली
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: अंजली दमानिया यांचा गंभीर दावा: अजित पवार यांच्या मृत्यूचा जादूटोण्याशी संबंध

अमरावती : १८० मुलींचे लैंगिक शोषण! आरोपी अयानच्या घरावर चालवला बुलडोझर, नवनीत राणा म्हणाल्या-मृत्युदंडाची शिक्षा द्या

'कैसा हराया' व्हायरल एआयएमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्यावर मोठा आरोप, बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली; पद धोक्यात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनाम्यांची मालिका! वर्धा जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी राजीनामा दिला

गुप्तांगाला विजेचे धक्का देऊन कानामागे चाकूने खोलवर वार केले; कोल्हापूरमध्ये २५ लाख रुपयांची खंडणी न दिल्यामुळे व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments