Festival Posters

अभ्यास, अभ्यास ... दहावी , बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Webdunia
सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (21:03 IST)
राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाने दहावी -बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली. 
 
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीच्या बोर्ड परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. या    परीक्षेचा वेळा शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. 
 
विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तारखेची खात्री करून त्यात हरकत असल्यास लेखी स्वरूपात मंडळाकडे 15 दिवसांच्या आत पाठवावे. तसेच व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. 
 
 हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पेट्रोल-डिझेलला पर्याय तयार! Tata Motors ची पहिली Flex Fuel कार भारतात लवकरच

केंद्राच्या कांदा खरेदी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापले: ₹१,२३५ च्या दराला 'जखमेवर मीठ चोळण्यासारखे' म्हटले; आंदोलनाचा इशारा

LIVE: केंद्राच्या कांदा खरेदी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापले

कोल्हापुरात हृदयद्रावक घटना; अडीच वर्षांपूर्वी ज्या घाटात पत्नी-मुलांना गमावले, त्याच ठिकाणी पुण्याच्या व्यक्तीने संपवले जीवन!

६५० गुण मिळण्याची अपेक्षा होती': NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चार वर्षांपासून करत होता परीक्षेची तयारी

पुढील लेख
Show comments