Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी

Webdunia
शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (14:30 IST)
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच मिरवणुका आणि सभांना देखील बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी गुरुवारी (दि. 8) जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सीमाप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या कोल्हापूर कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 10) कोल्हापुर येथील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यामधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. कर्नाटक सरकारचे सीमावासियांवर होणारे अत्याचार यावर विचारविनिमय करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, शिवसेनेचे संजय पवार, जयश्री जाधव यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते.
 
तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अपमान, महाराष्ट्रातून बाहेर जाणारे प्रकल्प, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारविरोधात मुंबईत 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments