Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जमाफी, दुष्काळ मदत फक्त गाजर, स्वभिमानीचे मराठवाड्यात आंदोलन

Webdunia
कर्जमाफीच्या नावावर शेतकर्‍यांची घोर फसवणूक झाली असून आताही दुष्काळाचं गाज दाखवलं जात आहे. सरसकट सबंध जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याऐवजी मंडलनिहाय जाहीर केला जात आहे याचा निषेध करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 
 
शेतकर्‍यांना कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन यांनी केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकर्‍याला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, खरीप पीक विमा १०० टक्के मंजूर करुन तात्काळ द्यावा, तुरीला २५ टक्के पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी, दावणीला चारा द्यावा, कृष्णा खोर्‍याचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला तात्काळ द्यावे, शेतकर्‍यांचे वीज बील आणि त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे साखरेचे दर किमान ३५०० रुपये निर्धारित करावेत आदी मागण्या या मोर्चाने केल्या आहेत. मोर्चात सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, अ‍ॅड. विजय जाधव, धर्मराज पाटील, महारुद्र चौंड, माणिक कदम, गणेश माडजे, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, रमाकांत मोरे यांचा सहभाग होता.  
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments