Marathi Biodata Maker

कर्जमाफी, दुष्काळ मदत फक्त गाजर, स्वभिमानीचे मराठवाड्यात आंदोलन

Webdunia
कर्जमाफीच्या नावावर शेतकर्‍यांची घोर फसवणूक झाली असून आताही दुष्काळाचं गाज दाखवलं जात आहे. सरसकट सबंध जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याऐवजी मंडलनिहाय जाहीर केला जात आहे याचा निषेध करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 
 
शेतकर्‍यांना कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन यांनी केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकर्‍याला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, खरीप पीक विमा १०० टक्के मंजूर करुन तात्काळ द्यावा, तुरीला २५ टक्के पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी, दावणीला चारा द्यावा, कृष्णा खोर्‍याचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला तात्काळ द्यावे, शेतकर्‍यांचे वीज बील आणि त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे साखरेचे दर किमान ३५०० रुपये निर्धारित करावेत आदी मागण्या या मोर्चाने केल्या आहेत. मोर्चात सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, अ‍ॅड. विजय जाधव, धर्मराज पाटील, महारुद्र चौंड, माणिक कदम, गणेश माडजे, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, रमाकांत मोरे यांचा सहभाग होता.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: बीएमसीच्या नामांकित १० नगरसेवकांची नावे जाहीर झाली

नागपूर: निरोप समारंभात झालेल्या निषेधामुळे ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला

नवी मुंबईतील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल- मुख्यमंत्री फडणवीस

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाहनांवर लावण्यात येणाऱ्या हरित करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

पुढील लेख
Show comments