suvichar

पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला, पोलिसांवर गोळीबार नंतर हल्लेखोराने केली आत्महत्या

Webdunia
बुधवार, 17 एप्रिल 2019 (09:22 IST)
पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या परिसरात एका अज्ञात व्यक्तीने 23 वर्षीय तरुणावर अॅसिड हल्ला केला. या अॅसिड हल्ल्यानंतर आरोपीने पोलिसांवरही गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या अॅसिड हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला असून त्यानंतर दुस-याने त्याच्यावर  गोळीबार करण्यात आला.हल्लेखोराने आधी एका तरुणावर अ‍ॅसिड फेकले आणि पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
 
 रोहित विजय थोरात (वय २५, रा़ सदाशिव पेठ) असे या तरुणाचे नाव आहे़ या अ‍ॅसिड हल्ल्यात त्याचा चेहरा आणि मान भाजली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेला तरुण पुण्यातील टिळक रोडवर एका मैत्रिणीसोबत बोलत थांबला होता. अचानक एका अज्ञात व्यक्तीने तरुणाच्या तोंडावर आणि पाठीवर अॅसिड फेकले. यानंतर तरुणाच्या मैत्रिणीने आरडाओरड केली. यानंतर घाबरलेल्या आरोपीने पोलिसांवर बंदुकीने गोळीबार केला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी थोरात याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले. त्याचवेळी गोळीबार करण्यासाठी तो गेलेल्या इमारतीमध्ये पोलिसांनी जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीस आणि हल्लेखोरामध्ये जवळपास 2 तास धुमश्चक्री उडाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानही पोहोचले. तब्बल दोन तासांच्या धुमश्चक्रीनंतर त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हा हल्ला नेमका कशासाठी आणि का करण्यात आला होता. या पोलीस तपास करत आहे.  विश्रांतीबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून हा हल्ला प्रेम प्रकरणातून झाला असे प्राथमिक तपासत समोर आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments