Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायगड पालकमंत्री मीच - आ. भरत गोगावले यांचा पुन्हा दावा

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2023 (07:41 IST)
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आम्ही केव्हापासून तयार आहोत. फक्त फोन येऊ द्या, निरोप येऊ द्या, मग आम्ही निघालोच, अशी प्रतिक्रिया महाडचे आमदार भरत गोगावले यांनी दिली. तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मलाच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना दुसर्‍या टप्प्यात संधी मिळेल असं आश्वासन नेत्यांना देण्यात आलं आहे.
 
यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी एका खासगी न्युज चॅनलशी बोलताना केला आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आम्ही केव्हापासूनच तयार आहोत. फक्त फोन येऊ द्या, निरोप येऊ द्या, मग आम्ही निघालोच, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली. गेल्या जून महिन्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले.
 
तेव्हा राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन उलटल्यानंतरही अनेक नेते मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आणि अजित पवारांसह नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातच, रायगडमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या आदिती तटकरे यांनाही मागून येऊन मंत्रिपद मिळाले, परंतु आ. भरत गोगावले यांना अद्यापही मंत्रीपद दिलेले नाही. 

संबंधित माहिती

दिल्लीत होणार भाजपच्या बड्या नेत्यांची महत्त्वाची बैठक,पराभवानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणार

EVM वादावरून प्रफुल्ल पटेल यांचा इलॉन मस्क यांना फुकटचा सल्ला देऊ नका म्हणत हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडीच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू, असा झाला अपघात

अमोल कीर्तिकरांची जागा आम्ही जिंकली, आदित्य ठाकरेंनी EVM वर प्रश्न उपस्थित केला, कोर्टात जाणार म्हणाले

Blade in Air India Meal एअर इंडियाच्या खाद्यपदार्थात सापडले ब्लेड, प्रवाशांनी केला गोंधळ, एअरलाइनला माफी मागावी लागली

T20 World Cup: सुपर-8 मध्ये भारताचे सामने ठरले, जाणून घ्या कधी कोणत्या संघ बरोबर होणार सामना

पाण्यासाठी महिलांना विहिरीत उतरावे लागत आहे, नाशिकमधील जलसंकटाचा व्हिडिओ पहा

EVM खराब असेल तर राजीनामा द्या- राहुल गांधींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार

मुंबईत कॉलेजने हिजाबवर बंदी घातली, 9 विद्यार्थिनींनी ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा

पंकजा मुंडे पराभूत झाल्यामुळे 4 समर्थकांनी आत्महत्या केली, ढसाढसा रडल्या भाजप नेत्या

पुढील लेख
Show comments