rashifal-2026

राज्यात सर्वत्र पाऊस, शेतकरी सुखावला

Webdunia
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या सर्वच भागात पावसाचे दमदार पुरागमन झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी मराठवाडा आणि विदर्भातील पिकांनी माना टाकल्या होत्या. पावसाच्या पुनरागमनामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे. राज्यातील धरणातील पाण्याच्या साठ्यातही चांगली वाढ झाली आहे. बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पिकांवर आलेले विघ्न काहीसे टळल्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे. पुढच्या 48 तासांतही कोकणासह राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
सुरुवातीला पडलेल्या चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. मात्र पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके संकटात सापडली होती. शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी दुबार पेरणीही केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपाचे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली होती. पावसाअभावी राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने राज्य सरकारचीही चिंता वाढली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments