Dharma Sangrah

कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि सोलापूर पुराचे २७ बळी

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (10:20 IST)
पुणे विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर पाच जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे २७ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील तब्बल दोन लाख जणांना सुक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही सर्व माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
 
प्रशासनाकडून सुरू असलेले बचावकार्य हे पुरात अडकलेल्या अनेकजणांपर्यंत पोहचले नाही हे उघड होत आहे. अजूनही शेकडोजण आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. तर सरकारकडून सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच आवश्यक त्या वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार असल्याचेही  त्यांनी सांगितले आहे.
 
कर्नाटकातील आलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी परवानगी दिली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली अभूतपूर्ण पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

गुप्तांगाला विजेचे धक्का देऊन कानामागे चाकूने खोलवर वार केले; कोल्हापूरमध्ये २५ लाख रुपयांची खंडणी न दिल्यामुळे व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

मुंबईत पार्किंगच्या वादातून निवृत्त कर्मचाऱ्याला मारहाण करून हत्या

आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये बोलेरो गाडीची लॉरीला धडक, ८ यात्रेकरूंचा मृत्यू तर अनेक जण जखमी

मुंबई : आंतरराज्यीय एटीएम कार्ड फसवणूक टोळीचा पर्दाफाश, आरोपीला अटक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा दौऱ्यावर येणार; वाहतूक मार्गात मोठे बदल

पुढील लेख
Show comments