Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rain Update: पावसामुळे 3 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती; अमरावतीमध्ये घर कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 19 जुलै 2022 (12:25 IST)
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांत नद्यांना पूर आला असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील खुब गावात आज सकाळी एका घराची भिंत कोसळली. या भिंतीखाली 5 जण अडकले होते, त्यापैकी 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. 3 जणांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे.
 
 चंदा वराडे आणि पायल वराडे या आई आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या गावाचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. त्याचवेळी राज्यात 1 जूनपासून पाऊस आणि पुरामुळे 105 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने सोमवारी ही माहिती दिली.
 
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने एका अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बहुतांश भागात सामान्य पाऊस पडत आहे, परंतु रत्नागिरी, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.  मुंबईत सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण कायम होते.
 
राज्यात 1 जून ते 17 जुलै दरम्यान पूर, वीज पडणे, दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, इमारत कोसळणे या घटनांमध्ये आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासांत इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments