Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑगस्टमध्ये पावसाची तूट ६० टक्क्यांवर

Webdunia
बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (07:24 IST)
महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जून महिन्यातील तूट भरून निघाली होती. गत ५ वर्षाच्या आकडेवारीचा विचार केला असता यंदा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ब्रेक घेतला. १ ते २५ ऑगस्टदरम्यान या महिन्यातील पावसाची तूट ६० टक्क्यांवर गेलेली आहे. १ जून ते २५ ऑगस्ट दरम्यानच्या पावसाची तूट ही १४ टक्क्यांवर पोहोचली. दरम्यान, गतवर्षी या दिवसाच्या तुलनेत यंदा पाच पट पाण्याचे टँकर वाढले. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक वाढली आहे.
 
२०२२ चा विचार केला असता गेल्या वर्षी राज्यात ऑगस्ट महिन्यात २९ गावांमध्ये टँकर सुरु होते. यंदा ही संख्या १७६६ टँकर्सवर पोहोचली आहे. सर्वाधिक टँकर पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रात १७६, उत्तर महाराष्ट्रात १३५ टँकर सुरु आहेत. केंद्र सरकारकडून देशभरातील पावसाच्या तुटीचा आढावा घेण्यात आला आहे.

राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पीक विमा कंपन्यांनादेखील पिकांची स्थिती कशी राहते, या संदर्भात माहिती घेण्यास सांगितले आहे.यंदाच्या पावसाळ्याच्या मध्यावर पावसाने ब्रेक घेतल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
राज्यातील ३७६ मंडळांमध्ये गेल्या २१ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

8-10 दिवसांत नवीन टोल प्रणाली लागू केली जाईल, नितीन गडकरी यांची घोषणा

पक्षाच्या प्रवक्त्यांबाबत उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा, या 7 नेत्यांना दिले विशेष स्थान

नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने केले लज्जास्पद कृत्य,सहप्रवाशावर केली लघवी

LIVE: नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

पुढील लेख
Show comments