Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मग दुष्काळ निवारणाची कामे का होत नाहीत ? राज ठाकरे

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (16:52 IST)
सरकारसाठी इतर राज्य सरकारांच्या तुलनेत जास्त पैसा असतानाही दुष्काळ निवारणाची कामे का होत नाहीत, असा सवाल  मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी विचारला. दुसरीकडे मराठा आरक्षणावरून सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची टीका राज यांनी केली. मराठा आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना बोलवा आता असेही राज म्हणाले. स्थानिकाना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज भासणार  नाही, असेही त्यांनी नमूद केले. अभ्यास दौऱ्यांवर फुकटचा खर्च केला जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. 
 
दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचार. जे चुकीचे सुरू आहे त्याबाबत बोलले पाहिजे अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. मोदी सरकारविरोधात मी बोलत आहे, कारण त्यांनी कामे केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामे केली नाहीत, तर कोणतेही सरकार असो त्याविरोधात बोलले पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments