suvichar

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

Webdunia
बुधवार, 11 मे 2022 (15:22 IST)
राज ठाकरेंची मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेली भूमिका सध्या राज्यात चांगलाच वाद निर्माण करत आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी अनेक मनसैनिकांची धरपकड केली असली तर या सगळ्या गोंधळात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेआणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमक्या देणारं पत्रही आपल्याकडे आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
 
या प्रकरणात नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि नंतर माध्यमांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची माहिती दिल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं. नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचीही भेट घेतली होती. 
 
याबद्दल नांदगावकर म्हणाले की मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली असून या पत्राची प्रत मी काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली आहे. गृहमंत्र्यांशीही बोलणं झालं आहे. हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल माहिती नाही. राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य आणि केंद्र सरकरानेही घ्यावी असे म्हटले.
 
धमकीचं हे पत्र हिंदीतून लिहिलेलं असून या पत्रात काही उर्दू शब्दही वापरण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आपण गृहमंत्र्यांशी बोललो आहे. ते चांगले गृहमंत्री आहे, ते नक्कीच कारवाई करतील, असंही नांदगावकर म्हणाले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं, अशी अपेक्षाही नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments