rashifal-2026

ही तर अराजकतेकडे वाटचाल : राज ठाकरे

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:16 IST)

सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांवरच न्याय मागण्याची वेळ येतेय, यावरून देश किती अराजकतेकडे चालला आहे याची कल्पना येते, अशी  प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे व्यक्‍त केली.

सरकार सर्वत्र नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. माध्यमेही उघडपणे बोलू शकत नाहीत. आता तर न्याय व्यवस्थेवरच नियंत्रण ठेवण्याचा सरकारकडून प्रयत्न झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जनतेच्या न्यायालयात येऊन आपली बाजू मांडल्यानंतर स्पष्ट होत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडत आहे. त्यामुळे त्या न्यायाधीशांचा किती कोंडमारा झाला असावा, याचा अंदाज येऊ शकतो, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

सरकारच्या प्रत्येक ठिकाणच्या अतिक्रमणावर बोट ठेवताना राज ठाकरे यांनी सांगितले की, ‘अडीच माणसे देश चालवत आहेत.’ ही सर्व परिस्थिती देश अराजकतेकडे वाटचाल करत असल्याचे दाखवण्यास पुरेशी आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतीलच, असेही ते यावेळी म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली

LIVE: संजय राऊत यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा रद्द

नांदेडमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली; ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यवतमाळला मोठी भेट दिली, ५७० कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी

सिक्कीममध्ये दोनदा भूकंपाचे धक्के बसले; लोकांमध्ये घबराट पसरली

पुढील लेख
Show comments