Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणुकीसाठी फंड तो जमवण्यासाठीच ही प्लास्टिकबंदी लागू - राज ठाकरे

Webdunia
मंगळवार, 26 जून 2018 (17:18 IST)
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारव निशाना साधला आहे. राज यांनी आज पत्रकार परिषदेत प्लास्टिक बंदीवर जोरदार टीका केली आहे. राज म्हणाले की जर एखाद्याला आलेला झटका, हे देशाचं किंवा राज्याचं धोरण ठरू शकत नाही. सरकारने कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता राज्यात प्लास्टिकबंदी केली, व नागरिकांकडून दंड आकारणं साफ चुकीचं आहे.
 
सरकारच्या नाकर्तेपणाचा दंड जनतेला कशासाठी? का करत आहात असा प्रश्न राज यांनी उभा केला आहे. मनसे प्रमुख  राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज यांनी आरोप केला आहे की प्लास्टिक उत्पादकांकडून निवडणुकीसाठी फंड मागण्यात आला होता आणि तो जमवण्यासाठीच ही प्लास्टिकबंदी लागू करण्यात आलीय असेही यांनी सांगितले आहे.
 
मुंबई काय कोणत्याही शहरात कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था नाही. 
जोपर्यंत सर्व सुविधा मिळत नाही, तोपर्यंत दंड देऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा की एका खात्याचा हेच मला समजत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे, असं सल्लाही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments