Dharma Sangrah

राज ठाकरे यांचा सरकारवर हल्ला : अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय का?

Webdunia
गुरूवार, 8 नोव्हेंबर 2018 (08:57 IST)
वाघिणीच्या मृत्यूच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. अनिल अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? असा सवाल राज यांनी पत्रकार परिषदेत सरकारला विचारला आहे.
 
अवनी वाघिणीला मारायची गरज नव्हती, तिला बेशुध्द करायला हवे होते. पुतळे उभारुन वाघ वाढत नाहीत असेही ते म्हणाले. वाघिणीला बेशुध्द करुन संवर्धन करता आले असते. जी गोष्ट तुम्हाला वाचवता आली असती, ती तुम्ही वाचवली नाही. इतर आयुधे आपल्याकडे आहेत. तिला बेशुध्द करुन संवर्धन करता आले असते असे राज यांनी म्हटले आहे.
 
अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर मुनगंटीवार बेफ्रिकीरीपणे उत्तर देत आहेत. ते वनमंत्री आहेत, याचा अर्थ त्यांना वनातले सगळे कळते किंवा त्यावर ते रिसर्च करत होते, असे नाही. ते आता मंत्री झाले आहेत, उद्या मंत्रिपद जाईल. त्यामुळे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने बोलावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
 
वाघिणीचे दोन बछडे सापडत नाहीत. ती कुठे असतील. म्हणजे एक जीव गेलाय, त्यासोबत आणखी दोन जीव जाणार. यांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही काहीही केले तरी आम्हाला काही होणार नाही. मला वाटतेय घोडौदान जवळ आहे. यांचा माज उतरणे अत्यंत आवश्यक आहे, असेही राज म्हणाले.
 
वाघिणीला जिथे मारले तिथून 60 किमी अंतरावर अनिल अंबानींचा प्रकल्प येत आहे. अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? असा सवाल तंनी केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री मदत निधी आता पूर्णपणे डिजिटल झाला, रुग्णांना मोठा दिलासा

बंगाल आणि बिहारनंतर आता महाराष्ट्रात एसआयआर मोहीम सुरू

LIVE: वधवान बंदराला ७६,२२० कोटी रुपयांची मंजुरी

RCB VS MI :वानखेडेवर मुंबई आणि RCB भिडणार,संभाव्य ११ खेळाडू जाणून घ्या

GT vs LSG :गुजरात टायटन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार, गुजरातने नाणेफेक जिंकली

पुढील लेख
Show comments