Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांचा सरकारवर हल्ला : अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय का?

Webdunia
गुरूवार, 8 नोव्हेंबर 2018 (08:57 IST)
वाघिणीच्या मृत्यूच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. अनिल अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? असा सवाल राज यांनी पत्रकार परिषदेत सरकारला विचारला आहे.
 
अवनी वाघिणीला मारायची गरज नव्हती, तिला बेशुध्द करायला हवे होते. पुतळे उभारुन वाघ वाढत नाहीत असेही ते म्हणाले. वाघिणीला बेशुध्द करुन संवर्धन करता आले असते. जी गोष्ट तुम्हाला वाचवता आली असती, ती तुम्ही वाचवली नाही. इतर आयुधे आपल्याकडे आहेत. तिला बेशुध्द करुन संवर्धन करता आले असते असे राज यांनी म्हटले आहे.
 
अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर मुनगंटीवार बेफ्रिकीरीपणे उत्तर देत आहेत. ते वनमंत्री आहेत, याचा अर्थ त्यांना वनातले सगळे कळते किंवा त्यावर ते रिसर्च करत होते, असे नाही. ते आता मंत्री झाले आहेत, उद्या मंत्रिपद जाईल. त्यामुळे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने बोलावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
 
वाघिणीचे दोन बछडे सापडत नाहीत. ती कुठे असतील. म्हणजे एक जीव गेलाय, त्यासोबत आणखी दोन जीव जाणार. यांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही काहीही केले तरी आम्हाला काही होणार नाही. मला वाटतेय घोडौदान जवळ आहे. यांचा माज उतरणे अत्यंत आवश्यक आहे, असेही राज म्हणाले.
 
वाघिणीला जिथे मारले तिथून 60 किमी अंतरावर अनिल अंबानींचा प्रकल्प येत आहे. अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? असा सवाल तंनी केला आहे.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments