Dharma Sangrah

राज ठाकरे घेणार आज मुख्यमंत्र्यांची भेट

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (11:54 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे ‘वर्षा’बंगल्यावर भेट घेणार आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करतील. त्यामुळे आजची चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.
 
२८ ऑक्टोबरला मुंबईतील मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि इतर कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात सुशांत माळवदे हे जबर जखमी झाले. आधीपासूनच फेरीवाल्यांविरोधात सुरु असलेल्या मनसेच्या आंदोलनाने यानंतर मात्र आक्रमक रुप धारण केले.
 
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधातील आपले आंदोलन आणखी तीव्र केले. मुंबई असो वा नवी मुंबई किंवा ठाणे, या प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनं केली. यामध्ये अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावलंही उचलली. एकंदरीतच फेरीवाला आंदोलनाने गेल्या काही दिवसात मोठं रुप धारण केलं आहे.
 
मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईतील अनेक रस्त्यांनी, रेल्वे स्थानकांबाहेरील जागांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे मनसेच्या आंदोलनांना पाठिंबाही वाढत गेला. त्यात काल  (1 नोव्हेंबर) काँग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन मोर्चा रोखला. मात्र त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालाड येथे अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याप्रकरणी भोंडुबाबा रिदम पांचालच्या विरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या रात्री वधू चोरी करून पळून जायची; अविवाहित पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी योजना: आता महाराष्ट्रात कांदा पावडरचे उत्पादन होणार

नांदेडमध्ये नाल्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

लखनौमध्ये भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांनी २०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments