Dharma Sangrah

रणजीत सावरकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (14:29 IST)
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. दुसरीकडे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी या सर्व पार्श्वभूमीवर रणजीत सावरकरांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवास  ‘स्थानी भेट घेतली.
 
रणजीत सावरकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. यावेळी नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. ही सदिच्छा भेट असल्याचं मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगण्यात आलं आहे. मात्र, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाहीसंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या शेगावमधील सभेला विरोध करण्यात आला होता. यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही मनसे नेत्यांना पलिसांनी चिखलीमध्ये ताब्यात घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर रणजीत सावरकर आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
 
“राहुल गांधींच्या विरोधात महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली. त्यात सर्वात मोठं आंदोलन मनसेनं केलं. त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या शेगावमधील सभेतही गेले. तिथे त्यांनी काळे झेंडे फडकावले. त्यासाठी मी राज ठाकरेंचे आभार माननण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी राहुल गांधींचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं”, अशी प्रतिक्रिया रणजीत सावरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पेट्रोल-डिझेलला पर्याय तयार! Tata Motors ची पहिली Flex Fuel कार भारतात लवकरच

केंद्राच्या कांदा खरेदी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापले: ₹१,२३५ च्या दराला 'जखमेवर मीठ चोळण्यासारखे' म्हटले; आंदोलनाचा इशारा

LIVE: केंद्राच्या कांदा खरेदी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापले

कोल्हापुरात हृदयद्रावक घटना; अडीच वर्षांपूर्वी ज्या घाटात पत्नी-मुलांना गमावले, त्याच ठिकाणी पुण्याच्या व्यक्तीने संपवले जीवन!

६५० गुण मिळण्याची अपेक्षा होती': NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चार वर्षांपासून करत होता परीक्षेची तयारी

पुढील लेख
Show comments