Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेला टोला, 'आता वाघाची शेळी झाली'

Webdunia
सोमवार, 6 जानेवारी 2020 (10:32 IST)
राज्यामध्ये शिवसेनेचे सरकार फार काळ टिकणार नाही. असे सांगत आता या वाघाची शेळी झाली आहे अशा शब्दांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. लातूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात राहिल. सरकार बदलण्याचा जिल्ह्याच्या सत्ताकारणावर परिणाम होणार नाही असे मत दानवे यांनी व्यक्त केले.
 
तसेच नागपूर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निडणुकीसाठी झालेल्या प्रचारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राज्यात तयार झालेलं सरकार विश्वासघात आणि बेईमानीचं सरकार आहे.
 
शिवसेना स्वार्थासाठी कुठेही जाऊ शकते. कुठेही स्थायिक होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेने बेईमानी वृत्ती दाखवली आहे. बेईमानानी आणि विश्वासघातानं बनलेलं सरकार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं. 

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुढील लेख
Show comments