Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी नोंदणी सुरु

Webdunia
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)
महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात एनटीएस स्पर्धेच्या आगामी परीक्षेसाठी नोंदणी सुरु झाली आहे. ८ ऑक्टोबरपासून परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर २०२० रोजी होणार असून राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा १३ जून २०२१ रोजी होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी २५ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र परीक्षा परिषेदेने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. इयत्ता १०वीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्कासह ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन विषय मिळून २०० गुणांची परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, कन्नड व तेलगू अशा सात भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mscepune.in किंवा http://nts.mscescholarshipexam.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन परिषदेने केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments