Festival Posters

माणिकखांब जवळ सशस्त्र दरोडा; "इतक्या" कोटी रुपये किमतीचा ऐवज लंपास

Webdunia
शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (20:37 IST)
इगतपुरी - मुंबई आग्रा महामार्गावर आज पहाटेच्या सुमाराला सशस्त्र दरोडा पडला आहे.
 
सोन्या चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसची इको गाडी क्र. MH 12 UJ 7948 वर पाच सहा अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. फिल्मी स्टाईलने महामार्गावरील माणिकखांब गावच्या जवळ गाडीच्या पुढे मागे गाडी आडवी लाऊन ही घटना घडली आहे.
 
ह्या घटनेत डोळ्यात मिरचीची पूड आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत ३ कोटी ६७ लाख ५५ हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला. लुटलेल्या ऐवजात १०० ग्रॅम वजनाचे ११ सोन्याची बिस्किटे, ९० किलो वजनाच्या चांदीच्या विटा, ४५ किलो वजनाचे चांदीचे दागिने समावेश आहे. ह्या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ माजली आहे.
 
घोटी पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. गोपालकुमार अशोककुमार, वय २० वर्ष, रा. किरावली जि. आग्रा उत्तरप्रदेश सध्या राहणार काळबादेवी मुंबई यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी वाडीवऱ्हेजवळ ५८ किलो सोने वाहून नेणाऱ्या वाहनाला लुटल्याची घटना घडली होती. आजच्या घटनेमुळे मागची घटना नागरिकांना आठवली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments