suvichar

बारावीच्या परीक्षेसाठी जामीनवर जेल बाहेर पडला आणि केला खून

Webdunia
गुरूवार, 24 मार्च 2022 (13:04 IST)
सांगली : सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 12वी ची परीक्षा देण्याच्या बहाण्याने आरोपी जामिनावर बाहेर आला होता. आणि दरम्यान त्याने खून केल्याचं उघडकीस आलं आहे. 
 
मंगळवारी संध्याकाळी सांगली स्टॅंडकडे जाणाऱ्या रोडवर रोहन नाईकचा खून झाला होता. या हत्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. संबंधित आरोपी कारागृहात होता आणि बारावीची परीक्षा देण्याच्या निमित्ताने जामिनावर जेलबाहेर आला होता.
 
माहितीनुसार एसटी स्टँड रोडवर अज्ञात हल्लेखोरांकडून रोहन नाईक या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते तसेच हल्लेखोरांनी रोहनवर दगडानेही हल्ला केला होता. या हल्यात रोहनचा जागीच मृत्यू झाला.
 
रोहन पेटिंगचे काम करत होता. मंगळवारी रंगपंचमी असल्याने त्याने कामातून सुटी घेतली होती आणि दुपारी तो मित्रांसोबत रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाच्या अंगावर रंग पडल्याने संशयित आणि त्याच्यात वाद झाला होता. वादावादी वाढल्याने दोन्ही गट समोर आले होते मात्र वाद तेव्हा मिटवण्यात आला होता.
 
मंगळवारी सांयकाळी एका बारमध्ये पुन्हा एकदा हे दोन्ही गट समोरासमोर आले आण पुन्हा वाद घडला. नंतर मृत रोहन आपल्या मित्रांसह तिथून बाहेर आला व सिव्हिल चौकाकडे येत असताना संशयितांनी त्याचा पाठलाग करत तो पळून जात असताना एकाने धारदार हत्याराने त्याच्या पाठीत वार केला. यावेळी तो कोसळून जागीच ठार झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: शरद पवार यांनी एका निवेदनातून पंतप्रधान मोदींकडे एक मोठी मागणी केली

पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, पंतप्रधानांकडे ही महत्त्वाची मागणी

हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट; विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली

राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे; महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट

पुढील लेख
Show comments