Marathi Biodata Maker

उंटावरून शेळ्या हाकणारे सरकारः सचिन सावंत

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (11:01 IST)
केंद्रात व राज्यात उंटावरून शेळ्या हाकणारे सरकार असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्तुतीपाठक होण्यापेक्षा मोदींच्या निर्णयात राज्याचे हित काय आहे ते पहावे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
 
गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना सावंत म्हणाले की नोटबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील जनता उध्दवस्त झाली असून केंद्र व राज्य सरकार स्वतःच दररोज नवनविन घोषणा करून राज्यात अनागोंदीचे वातावरण तयार करत आहे. दिवसेंदिवस जनतेचे प्रश्न गंभीर होत असताना गेल्या 15 दिवसांत सरकारने22 वेळा पैसे बँकेत भरणे आणि बदलून देण्याबाबतचे नियम बदलले आहेत. जनतेच्या हितासाठी नियम बदलण्याच्या वल्गना सरकारकडून केल्या जात आहेत पण यातून जनतेचे हित तर सोडाच अधिक गोंधळाचे वातावरण तयार होत असून सर्वसामान्यांना त्याचा प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतो आहे असे सावंत म्हणाले. 

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात देशामध्ये प्रामाणिक व प्रत्यक्ष उपयोगी पडणारे निर्णय घेतले जात नाहीत अशी व्यथा व्यक्त केली आहे. त्याचीच प्रचिती सरकारच्या प्रत्येक निर्णयातून येत आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments