rashifal-2026

न्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:39 IST)

सांगली येथे अनिकेत कोथले हत्याकांड झाले आहे. हे सर्व होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र या प्रकरणाचा  सीआयडी सुरु असून अजूनतरी  तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी दोघांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडला आहे.  पोलिसांनी दोघांना  ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी  सीबीआयकडे द्यावी  मागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आशिष कोथळेआणि अमित कोथळे अशी या दोघांची नाव.

दोन्ही भाऊ भावाच्या खुनाच्या तपासाबद्दल विचारणा करायला गेले होते.  मात्र पोलिसांनी योग्य उत्तर दिलेच नाही त्यामुळे यांचा संताप अनावर झाला. त्याच ठिकाणी स्टेशन समोर चौकात  अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. इतके भयानक प्रकरण असून सुद्धा प्रशासन मात्र ढिम्म आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करतांना दिसत नाही त्यामुळे सर्वत्र पोलीस यंत्रणा आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारतीय इतिहासातील सर्वात मोठी दरोडा! १००० कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक गायब झाला

Hapus Mango पुण्यातील फळ बाजारात हापूस आंब्याची एंट्री, पहिली पेटी १५,००० रुपयांना विकली गेली

पद्म पुरस्कार: ५ पैकी ३ पद्मविभूषण केरळवासीयांना... शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला

संजय राऊत यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, "जर मला सत्ता मिळाली तर मी त्याचे १५ तुकडे करेन"

पुढील लेख
Show comments