Marathi Biodata Maker

संजय राऊतांनी भाजपला विजयाबद्दल मारले असे टोले

Webdunia
शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:17 IST)
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी भाजपला विजयाबद्दल काही टोले लगावलेत. पंजाबच्या निकालांकडे आम्ही अधिक गांभीर्यानं पाहतो, पंजाबमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाहसह संपूर्ण भारतीय पक्षानं ताकद लावली. पण पंजाबमध्ये भाजपला एक जागा मिळालीय. सीमेवरचं राज्य आहे. संवेदनशील राज्य आहे. कायम अस्वस्थता असते. अशा ठिकाणी भारतीय जनता पक्षानं निवडून येणं गरजेचं असतं. पण त्यांना पंजाबसारख्या राज्यानं का नाकारलं. याच्यावर त्यांना चिंतन करावं लागेल, असंही ते म्हणालेत.
 
उत्तर प्रदेश, उत्तराखंड असेल ती त्यांचीच राज्यं होती. त्यांनी राखली, त्यात नवीन काय आहे. त्यांनी फक्त ती राखली आहेत. खरी मुसंडी अखिलेश यादव यांनी मारलेली आहे. त्यांच्या जागा तिप्पट झाल्यात. त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. त्यांनी चांगली लढत दिली. प्रियंका गांधी उतरल्या होत्या, तुम्ही जिंकलात ते ठीक आहे. त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पराभूत झाले. गोव्यात दोन उपमुख्यमंत्री पराभूत झाले. भारतीय लोकशाहीत निवडणुका होतात. हारजित होत असते. काल निवडणुका संपल्या, आजपासून कामाला लागलं पाहिजे, असंही ते म्हणालेत.
 
पंजाबमध्ये मला चिंता वाटते, कारण तिकडे एखादा राष्ट्रीय पक्ष सत्तेवर येणं गरजेचं आहे. कारण ते सीमेवरचं राज्य आहे. पंजाब हा पोरखेळ नाहीये. पंजाबच्या जनतेनं भाजपला इतक्या वाईट पद्धतीनं का नाकारलं, याबाबत सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. भाजपला मोठा विजय मिळाला, यूपी त्यांचे राज्य होते, तरीही अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचे योगदान आहे, या सर्वांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागणार आहेत. आपण आनंदी आहोत, जिंकणे आणि हरणे हे होतच असते. तुमच्या आनंदात आम्हीही सामील आहोत, असंही संजय राऊत म्हणालेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

मुंबईतील मुलुंड येथे मेट्रो लाईन ४ मधील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

रशीद खान टी-२० क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला

पुढील लेख
Show comments