Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्यजित तांबेंच्या बंडामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले-अजित पवार

Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (08:57 IST)
महाविकास आघाडीचे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आहोत. मविआमध्ये कोणताही संभ्रम नाही.आमच्यात एकवाक्यता आहे. काल नाशिकमध्ये जे झालं ते काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरुन राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या बंडामुळे पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्या महाविकास आघाडीची संयुक्त बैठक असणार आहे. या बैठकीत नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूकीबाबत ऩिर्णय घेणार आहोत.सत्यजित तांबे यांच्या बंडामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. नाशिक पदवीधरसंदर्भात बोलणं सुरु आहे. मी त्याबद्दल कॉंग्रेसला आधीच सावधान केलं होतं. मला आधीच कुणकुण लागली होती. कॉंग्रेसच्या नेत्यांना कल्पना दिली होती. मात्र तरीही काल जे घडलं यामुळे भाजपला संधी मिळाली असल्याचे अजित पवार म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments