Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर - शंकरअण्णा धोंडगे

shankaranna dhodage
Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (13:06 IST)

सर्वत्र दुष्काळ, नापिकी, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी संकटात असून सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी गुरुवारी लोहा पत्रकार परिषदेत केले.
 

शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत येऊन कर्जाच्या मोठ्या विळख्यात सापडली आहेत. कर्जमाफीच्या कचाट्यातून शेतकरी वर्ग अजूनही सावरला नाही. त्यामुळे विनाअट शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी आज पर्यन्त झाली नाही. परिणामी फडणवीस सरकार असंवेदनशील असून सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन शंकरअण्णा यांनी किसान मंच शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत लोहा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 

पुढे बोलताना ते म्हणाले की विदर्भातील शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था असून छत्तीस कोटी रुपयाचे सोयाबीन अनुदान अजूनही सरकारने दिलेले नाही.

परिणामी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन सुलतानी संकटाचा सामना कारावा असे मत त्यांनी मांडले. यावेळी बाबासाहेब देशमुख, माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, संजय पाटील कराळे, छत्रु महाराज, शिवराज पवार, बंटी सावंत, जीवन वडजे आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सिंधू जल करार काय आहे? भारताने करार थांबवल्याने लाखो पाकिस्तानी पाण्याच्या एक-एक थेंबासाठी आसुसतील!

Terror attack in Pahalgam उपमुख्यमंत्री अजित पवारांची जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा

पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार लवकरच तुरुंगात जातील म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

प्रेयसीच्या भावाने केली नववीच्या विद्यार्थ्याची गळा दाबून हत्या

LIVE: पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार लवकरच तुरंगात असतील म्हणाले फडणवीस

पुढील लेख
Show comments