suvichar

शरद पवारांनी केले मोठे विधान

Webdunia
शुक्रवार, 22 मार्च 2024 (15:30 IST)
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विरोधकांनी त्यांच्या अटकेनंतर केंद्र सरकार तसेच भाजपावर आगपाखड केली. या मुद्यावरून शरद पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास केजरीवाल यांच्या घरी  ईडीची टीम 10वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन पोहोचली. तसेच रात्री 9च्या सुमारास  दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ‘आप’तर्फे जोरदार निदर्शनं केजरीवालांच्या अटकेनंतर करण्यात आली. इंडिया आघाडीसह विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. शरद पवार यांनीही केजरीवाल यांची अटक चुकीची आहे, असे सांगत केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला. देशभरात आपच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी संध्याकाळी ईडीच्या कारवाईनंतर निषेध नोंदवला. केंद्र सरकार आणि भाजपावर कडाडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनीही या मुद्यावरून हल्ला चढवला. केजरीवालांच्या अटकेचा निषेध शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी नोंदवला. शरद पवार यांनी ‘मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानेच केजरीवालांवर कारवाई करण्यात आली ‘ असा आरोप केला. तसेच  भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही केला. भाजपकडून भीती पसरवण्याचे काम निवडणुकीच्या काळात सुरू आहे. आधी हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक केली. तर आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. माहिती नाही उद्या कोणाला अटक करतील. शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला, केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत. ईडीचा वापर करून राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर कारवाई केली जाते. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून लक्ष्य केलं जात आहे.त्यांना तुरूंगात टाकण्यात येत आहे.ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे.  आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली होती.  शरद पवार म्हणाले की, राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे. तसेच शरद पवार असेही म्हणालेकी, मोदींच्या भूमिकेला  केजरीवाल हे दिल्लीत बसून  विरोध करतात. म्हणून  त्यांच्या विरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणालेत.  

Published By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात TMS 2.0 लाँच केले

'SIR 2' साठी भाजप महाराष्ट्राने केली विशेष तयारी, प्रतिनिधींची यादी जाहीर

मुंबई: धारावी येथे छाप्यात लाखो रुपयांची औषधे जप्त

LIVE: एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय हनुमंत जगदाळे यांची ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदी नियुक्ती

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत होता

पुढील लेख
Show comments