Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांच्याबारामतीला भर पावसाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली,पाणीपुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार

Webdunia
मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (08:47 IST)
शरद पवारांच्या बारामतीला भर पावसाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. साठवण तलावात निरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने उपलब्ध पाणी साठा मर्यादित आहे. यामुळे पाणीपुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार आहे. त्यानुसार बुधवारी (दि २१) खालील भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, मेडदरोड, पतंगशाहनगर, महादेव मळा, सदगुरुनगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, वसंतनगर, अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, विट्टलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूररोड, एस. टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर आदी.
 
तसेच गुरुवारी (दि. २३) खालील भागात पाणीपुरवठा होणार नाही. तद्नंतर दिवसाआड पाणीपुरवठा होईल. कचेरीरोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबिर बोळ महावीर पथ, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांदूळवाडी वेस चौक, बुरुड गल्ली, नेवसेरोड. संपूर्ण कसबा, लक्ष्मीनारायणनगर, माळेगावरोड, जामदाररोड, खंडोबानगर जवाहरनगर, पोस्टरोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवणरोड, सिद्धार्थनगर. तरी वरीलप्रमाणे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments