Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांनी पावसात भिजून आणलेलं सरकार आता जनतेचा घाम काढतंय: अनिल बोंडे

Webdunia
गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:56 IST)
वर्धा : शरद पवारांनी पावसात भिजून सरकार आणलेलं सरकार आता जनतेचा घाम काढतंय अशी टीका माजी कृषीमंत्री अनिल बोंडे  यांनी केली आहे. शरद पवार पावसात भिजले म्हणून सरकार आलं असं म्हटल्या जातं आणि आता हेच सरकार लोडशेडिंग करून जनतेचा घाम काढतंय असा घणाघात बोंडेंनी केला आहे.
 
माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. सेनेसह महाविकास आघाडीतील हजारो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. वर्ध्याच्या आर्वी मतदार संघात पार पडलेल्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला गुड बाय केलं आहे. सत्ता असताना देखील कार्यकर्ते पक्ष सोडत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
 
जिल्ह्यातील राजकारणात बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा सध्या वर्ध्यात सुरु आहे. सोबतच नवाब मलिक यांच्यावर देखील अनिल बोंडेंनी निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी बेहिशोबी मालमत्ता कुणाच्या भरवशावर केलीय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments