Marathi Biodata Maker

शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह सुरू होणार

Webdunia
सोमवार, 7 मार्च 2022 (07:41 IST)
शिवाजी विद्यापीठातील दहा वसतगृह आजपासून सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासंदर्भातील पत्र अधिविभागप्रमुखांना वसतिगृह अधीक्षक पाठवणार आहेत, अशी माहिती वसतिगृह अधिक्षक डॉ. एस. पी. हंगिरगेकर यांनी दिली.
 
शिवाजी विद्यापीठातील दहा वसतिगृह तब्बल दोन वर्षांनी सुरू होणार आहेत. त्यामुळे अधिविभागात शिक्षण घेणाऱया परगावच्या जवळपास 3 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. वसतिगृहात राहून प्रत्यक्ष अध्ययन आणि प्रॅक्टीकल करण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. तसेच पीएच. डी. शोधप्रबंध व संशोधन प्रकल्प पूर्ण करणे सोयीचे जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या या निर्णयाचे अभिनंदन विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून वसतिगृह ताब्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, बेडची देखभाल दुरूस्ती अशी सर्व तयारी केली आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील सर्व वसतिगृहांचे खानावळ चालकाबरोबर करार झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या राहण्याचा व जेवणाचा प्रश्न मिटणार आहे. वसतिगृहा सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी विद्यापीठ परिसर विद्यार्थ्यांची गजबजणार आहे.
 
डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन
डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनमध्ये ‘कमवा व शिका योजने’ अंतर्गत गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना दररोज तीन तास काम करावयाचे आहे. सध्या 300 पेक्षा जास्त मुला-मुलींचे अर्ज आले आहे. मुलाखती घेवून त्यापैकी 200 मुला-मुलींना भवनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments