suvichar

शिवसेना रामदास कदम यांच्यावर नाराज, पालकमंत्री पद काढले

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:36 IST)
शिवसेनेत अंतर्गत कलह दिसून येतो आहे. यात रामदास कदम यांना शिवसेना  पक्षाती नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येते आहे. या नाराजी मुळे  त्यांना औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन हटविण्यात आले असणार असे चित्र निर्माण झाले आहे. यात नवीन निर्णयानुसार राज्य शासनाने तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदललेले आहेत.  याबाबतचे राज्य सरकारने अधिकृत  परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता या शासनाच्या नवीन निर्णयानुसार औरंगाबादचे पालकंमत्रीपद रामदास कदम यांच्याकडून काढून घेऊन ते डॉ. दीपक सावंत यांच्याकडे दिले आहे.  औरंगाबादच्या नामांतरावरून खासदार चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यात वाद झाला होता. या वादावरुन त्यांना हटविल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच भाजपवरही कदम यांनी जोरदार टीका केली. खैरे यांच्या वादानंतर रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून काढेल आहे असे  चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता रामदास कदम काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

आयपीएल २०२६ च्या आधी बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले, या कारणामुळे उद्घाटन सोहळा रद्द केला

अमरावती: रुग्णवाहिकेची पीएसआयच्या गाडीला धडक, १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू

LIVE: संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवेमुळे घबराट

प्रियंका चतुर्वेदी का संतापल्या? वाचा

अशोक खरातच्या केबिनमध्ये काय घडायचे?

पुढील लेख
Show comments