Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्करोगाचे चुकीचे निदान, महिलेचे पोटातले बाळ दगावले

Webdunia
गुरूवार, 7 मार्च 2019 (10:52 IST)
कर्करोग नसतानाही शहरातील एसआरएल लॅबने कर्करोगाचे निदान केल्याने एका महिला डॉक्टरवर दोनदा केमोथेरपी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. यामुळे गर्भातील दोन महिन्यांचे अर्भकही पडल्याने महिलेस शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, जिल्हा ग्राहक मंचाने चुकीचे निदान करणार्‍या रेलीगेल कंपनीस सात लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
नाशिकमधील एका महिला डॉक्टरचे पोट दुखत असल्याने महिलेने एका रुग्णालयात तपासणी केली होती. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलेने 'सुपर रेलिगर लॅबोरेटरिज'मध्ये कर्करोग सबंधी अशी बायस्पी चाचणी केली. या लॅबने दिलेल्या अहवालानुसार महिलेस कर्करोग आहे, असे निदान झाले होते. त्यामुळे महिलेस प्रचंड मानसिक धक्का बसला. मात्र महिलेने कर्करोगावर उपचार सुरू केले. दोन केमोथेरपी झाल्यानंतर पोटातील बाळास धोका नको या हेतूने महिलेने मुंबईतील टाटा रुग्णालयात तपासणी केली. तेथे केलेल्या बायस्पी चाचणीत महिलेस कर्करोग नसल्याचे सांगितले गेले. तरीही पुन्हा एकदा शंका नको म्हणून महिलेने मुंबईतीलच खासगी रुग्णालयात पुन्हा चाचणी केली. त्यातही कर्करोग नसल्याचे उघड झाले. त्यामुळे महिलेचे कुटुंबीय प्रचंड गोंधळले. तर कर्करोग उपचार सबंधी केमोथेरपीमुळे पोटातील दोन महिन्यांच्या गर्भाचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे महिलेने ग्राहक मंचात दाद मागितली. संबंधित लॅबोरेटरी चालविणाऱ्या अंधेरीच्या रेलिगर नावाच्या कंपनीविरूध्द २० लाख रूपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला. अ‍ॅड. सारिका शाह यांनी त्या महिलेची बाजू न्यायालयापुढे मांडली.वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालावरून न्यायालयाने रेलीगेल कंपनीस सात लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments