Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कृषी कायद्यांविरोधात 50 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यानी केल्या सह्या

Webdunia
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (14:01 IST)
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसकडून विरोध होतोय. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून काँग्रेसतर्फे राज्यात सह्यांची मोहीम राबवली गेली. या मोहिमेत 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करुन या मोहिमेत सहभाग नोंदवला. अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
 
या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, जुलमी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी 2 कोटी सह्यांची मोहीम राबवण्याचे निश्चित केले होते. 2 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 
 
“कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान किसान अधिकार दिवस, धरणे आंदोलन, राजभवान येथे जाऊन राज्यपालांना निवेदन तसेच महाव्हर्च्युअल किसान रॅलीच्या माध्यमातूनही भाजप सरकारच्या या अन्यायी कायद्याला विरोध केला. या महामेळाव्यात राज्यातील 10 हजार गावं आणि खेड्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावतीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला. तसेच सह्यांची मोहीमही राबवण्यात आली,” असं थोरात म्हणाले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments