Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर पुन्हा भारनियमन, ऊर्जामंत्री यांचे संकेत

Webdunia
मंगळवार, 1 मार्च 2022 (07:29 IST)
मोठय़ा प्रमाणावरील ग्राहकांचे वीज देयक थकित असल्याने महावितरण आर्थिक संकटात आहे. थकबाकी वाढल्यास आगामी काळात राज्यातील जनतेला पुन्हा भारनियमनास सामोरे जावे लागेल, असे संकेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  अकोला येथे दिले. वीज केंद्रांच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. 
 
‘‘महावितरणला पैसे देऊन बाहेरून वीजखरेदी करावी लागते. करोना काळात सर्वत्र टाळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करण्यात आला. करोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले हे मान्यच. पण,  वीज वापरली असेल तर देयकाचे पैसे भरावेच लागतील’’, असे नितीन राऊत म्हणाल़े
 
राज्यात कोळशाचा साठा अपुरा आहे. तो एक-दोन दिवस पुरेल इतकाच आहे. त्याचा परिणाम विजेच्या उत्पादनावर होऊ शकतो. उत्पादन कमी झाल्यास विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्यात भारनियमन केले जाऊ शकते, असेही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

पुढील लेख
Show comments