suvichar

वडिलांची आत्मा काढण्यासाठी मुलाने केली आईची हत्या

Webdunia
मुंबईत फॅशन डिझाइनर सुनीता सिंहच्या हत्या प्रकरणी तिच्या मुलाला अटक केली गेली आहे. चौकशीत काही विचित्र गोष्टी उघडकीस आल्या आहेत.
 
मॉडेल मुलाने सांगितले की आईला मारणे त्याच्या हेतू नसून त्याला केवळ आईतून वडिलांची आत्मा काढायची होती. मुंबईच्या लोखंडवाला स्थित फ्लॅटमध्ये 4 ऑक्टोबर रोजी सुनीताची हत्या केली गेली.
 
आरोपी मुलगा लक्ष्य याने पोलिसांना सांगितले की आईत वडिलांची आत्मा येत असताना ती विचित्र वागायची. पेश्यांपासून ते नशा करण्याचा हठ्ठ धरायची. एवढेच नव्हे तर त्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकायची आणि नकार दिल्यावर भांडायची.
 
लक्ष्यने सांगितले की बुधवारी मित्रांसोबत पार्टी करत असताना त्याची आई नशेत तिथे येऊन विचित्र वागू लागली. पोलिस त्याच्या मित्र निखिल आणि महिला मैत्रिणीशी चौकशी करत आहे. पोलिसांप्रमाणे लक्ष्याची महिला मैत्रीणदेखील व्यसन करते. त्या दिवशी तो एका बाबाला देखील भेटला होता आणि पोलिस त्याचाही तपास करत आहे. दरम्यान त्याने आईशी मारहाण करत तिला बाथरूममध्ये कोंडून दिले होते आणि तिथून निघून गेला होता.
 
पोस्टमॉर्टम रिपोर्टप्रमाणे सुनीताच्या चेहर्‍या आणि मानेवर जखम होती ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. लक्ष्यने चौकशीत सांगितले की सायंकाळी 8 वाजता घरी आल्यावर त्याला आई बाथरूममध्ये बेशुद्ध पडलेली दिसली. नंतर त्याने मित्रांना फोन करून या प्रकरणाबद्दल सांगितले आणि आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी एम्बुलन्स मागवली तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.
 
पोलिसांप्रमाणे लक्ष्यला अटक केली गेली तेव्हा तो नशेत होता. त्याला अॅस्ट्रोराइड नामक ड्रग्स घेण्याची सवय आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments