Dharma Sangrah

एसटी बसने चिमुरडीसह चौघांना चिरडले

Webdunia
सोमवार, 23 जानेवारी 2023 (11:06 IST)
मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यात कोशिंबे फाट्यावर रास्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराला तसेच रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दोघांना एका एसटीबसने चिरडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 20 जानेवारी रोजी दुपारची आहे मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यात कोशिंबी फाट्यावर एक दुचाकीस्वार आपल्या ६ वर्षाच्या चिमुकलीसह रास्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या एसटी बसच्या तावडीत आले आणि चिरडले गेले या घटनेत दुचाकीस्वार जयवंत ठाकरे आणि त्यांच्या मागे बसलेले त्यांचे मित्र या दोघांना चिरडले. तसेच अभिजित जाधव आणि त्यांची सहा वर्षाची चिमुकली जिज्ञासा जाधव हे रास्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते. वेगाने येणाऱ्या बसने त्यांना धडक दिली त्यात जिज्ञासा आणि तिचे वडील जखमी झाले असून जिज्ञासाच्या डोक्याला मार लागला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हाय अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून बस हलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

"राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातील एक नाकारलेली वस्तू," असे मुख्यमंत्री फडणवीस का म्हटले?

LIVE: महाराष्ट्र तीव्र उष्णता आणि जीवघेण्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी सुरक्षा रक्षक श्याम सोनावणे यांना बडतर्फ केले

Update in Nashik TCS case टीसीएस आरोपी निदा खानला न्यायालयाने १४ दिवसांच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पाठवले

महाराष्ट्रात भीषण उष्णतेची लाट; विदर्भात ६ जणांचा मृत्यू; प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घरातच राहण्याचा सल्ला दिला

पुढील लेख
Show comments