suvichar

22 एप्रिल पासून एस टी पुन्हा धावणार

Webdunia
बुधवार, 20 एप्रिल 2022 (10:08 IST)
गेल्या साढे पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. राज्य सरकार मध्ये एसटीच्या विलीनीकरण आणि इतर मागण्या घेऊन एसटीचे कर्मचारी संपा वर बसलेले होते. आता एसटी संप संपला असून एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहे. त्यामुळे एसटी आता हळू- हळू पुन्हा आपल्या मार्गावर परतणार असून येत्या 22  एप्रिल पासून पुन्हा धावणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या अडचणी संपणार आहे. एसटी कर्मचारीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत होते. त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यासाठी त्यांना दुप्पटीने पैसे मोजावे लागत होते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार, एकूण 70 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. काल  मंगळवारी 7,435 एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले. 
 
एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं होते. तब्बल साढे पाच महिन्यांपासून हे आंदोलन सुरु होते. या काळात राज्यसरकारने काही कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या असून देखील कर्मचाऱ्यांचे संप सुरु होते. आता उच्च नायायालयाच्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू राहण्याचे सांगितले आहे. त्या मुळे  आता  एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपला असून एसटी कर्मचारी आता पुन्हा कामावर रुजू होणार आणि एसटी आता पुन्हा रस्त्यावर धावणार. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली

महाराष्ट्रातील पहिली सीबीएसई जिल्हा परिषद शाळा पुण्यात सुरू होणार, ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस उद्घाटन करणार

"आयटी कंपन्यांमधील धर्मांतर रॅकेट खपवून घेतले जाणार नाही," नाशिक प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

नाशिक : एका मोठ्या आयटी कंपनीत धर्मांतर रॅकेट: ९ पीडित समोर; सहा टीम लीडर्सना अटक

माजी भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments