Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, एसईबीसीच्या उमेदवारांना राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय

Webdunia
शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (08:30 IST)
राज्यात पोलिस भरती २०१९ साठी एसईबीसीच्या उमेदवारांना राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने जुना आदेश निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
पोलिस भरती २०१९ करता एसईबीसी च्या उमेद्वारांना आपले अर्ज दाखल करताना अडचनींना समोरे जावे लागत होते. ज्या उमेदवारांनी एसईबीसीमधून अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील दि. २३ डिसेंबर २०२०च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही गृहमंत्री देशमुख  म्हटले आहे.
 
येत्या काही महिन्यात राज्यातील पोलीस दलात सुमारे साडेबारा हजार जागा भरण्यात येणार असून, या भरती प्रक्रियेत एसईबीसी आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला होता. यामुळे एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे शुल्क भरण्याबरोबरच वयोमर्यादाही लागू होणार आहे. पोलिस भरतीत एसईबीसीतील जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाने जारी केला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments