Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हात झटकून केंद्राला बोट दाखवणं बंद करा, शेतकऱ्यांना भरघोस मदत करा : फडणीस

Webdunia
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (08:08 IST)
मुख्यमंत्री चूकीची माहिती सांगत आहेत, मुख्यमंत्र्यांकडे वस्तूस्थिती पोहोचली नाही. आम्ही गेलेल्या ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची तक्रार आहे. ८० ते ९० टक्के पंचनामे झाले हे सांगणे योग्य नाही. राज्य सरकार आपले हात झटकून केंद्राला बोट दाखवणं बंद करा आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करा, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाणी करत असून त्यांनी पत्रकार परिषद बोलत होते. 
 
तीन दिवसांमध्ये ९ जिल्ह्यांमध्ये प्रवास केला. एकूण परिस्थिती अत्यंत भीषण आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, कांदा यासह जवळजवळ सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. जमीन खरवडून गेली आहे. माती वाहून आणून शेतकऱ्यांना जमीन तयार करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले. ३ दिवसात ९ जिल्ह्यात ८५० किमी प्रवास केला. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे. पुढच्या पिकाकरिता जमीन तयार करायची हे मोठे आव्हान आहे. महाबीजचं बियाणं बोगस निघालं. तिबार पेरणी केल्यांनंतरही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणार नाही, कृषीपंप वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments