Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावरकरांच्या जन्मस्थळी कडकडीत बंद

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (21:11 IST)
नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या नाशिकच्या भगूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच, विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने मोर्चाही काढण्यात आला.
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांना मदत केली असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत केले. या वक्तव्याचे पडसाद विविध ठिकाणी पडत आहेत. सावरकर यांच्या जन्मस्थळी भगूर येथेही याचे पडसाद उमटले. भगूर बंदचे आवाहन सकाळीच करण्यात आले. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा आणि दुकाने बंद होती. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच, विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणारा मोर्चा काढण्यात आला. चौकामध्ये आंदोलकांनी निदर्शनेही केली.
 
दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश  दिल्याप्रमाणे नाशिकमधील मनसे कार्यकर्ते थेट शेगाव येथे राहुल गांधींच्या सभेच्या दिशेने रवाना झाले .नाशिकहून २००ह अधिक कार्यकर्ते सामील झाले. रात्रीच त्यांनी शेगावच्या दिशेने कूच केली. मात्र  चिखली पोलिसांनी नाशिकचे मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर तसेच शहर पदाधिकारी नितीन माळी यांच्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments