Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागणार, टोपे यांनी दिले संकेत

Webdunia
शनिवार, 3 एप्रिल 2021 (07:14 IST)
राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. एका मराठी वृत्तवाहिनीश संवाद साधताना त्यांनी हे संकेत दिले. देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्हे आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगरचा समावेश आहे. 
 
राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावण्यात येतील असे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. बेड्स, ऑक्सिजन, कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही त्या ठिकाणी अधिक निर्बंध करुन गर्दी कशी टाळली जाईल याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
 
लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द न वापरता निर्बंध लावले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती केली आहे. नाईट कर्फ्यू लावले आहेत. निर्बंध लावल्यानंतर गर्दी वाढतेय. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. लोकांनी काही दिवस नियमांचं पालन केलं तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. ज्यावेळी संसाधनं संपतात त्यावेळी चैन ब्रेक करण्यासाठी तातडीचा इलाज म्हणून लॉकडाऊन लावावा लागतो.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments