Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारावीच्या पेपर मध्ये चूक, चुकीच्या प्रश्नाचा विद्यार्थ्यांना मिळणार 1 गुण

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (17:28 IST)
काल पासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.तब्बल 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा देत आहे. कोरोना साथीच्या आजारानंतर प्रथमच बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत आहे. बारावीच्या इंग्रेजीच्या पेपर मध्ये 1 गुणांचा चुकीचा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 
 
चुकीच्या प्रश्नाबाबतच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डासमोर मांडल्या. बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांना बोर्डाकडून 1 गुण अधिक दिला जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. काल पासून सुरु झालेली बारावीची परीक्षा 7 एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. 
 
यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी साठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. 
 गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्यानं विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 70 ते 100 गुणांचा पेपर लिहिण्यासाठी 30 मिनिटे तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

पुणे पोर्श घोटाळा: काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी, नाना पटोले म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

नांदेड : पेनगंगा नदीच्या काठी कुटुंबासमोर तीन मुली बुडाल्या

पुण्यातून 5 बांगलादेशी घुसखोरांना अटक

कोलकात्याच्या विजयानंतर रिंकूसिंगची गर्जना म्हणाले-

सौदीप्रो लीगच्या एका हंगामात रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला

T20 World Cup 2024: World Cup 2024 मध्ये हे युवा खेळाडू पहिल्यांदाच खळबळ माजवतील!

डेरा प्रमुख राम रहीम हत्येप्रकरणी निर्दोष,पंजाब हरियाणा उच्च न्यायालया ने निर्णय दिला

रेमल चक्रीवादळामुळे आसाममध्ये मुसळधार पाऊस, 2 जणांचा मृत्यू, 17 जखमी

प्रज्ञानंदनचा सामना फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझाशी

उद्धव ठाकरे वि. एकनाथ शिंदे : 'हे' 13 लोकसभा मतदारसंघ ठरवणार ‘शिवसेना’ कुणाची?

पुढील लेख
Show comments