Marathi Biodata Maker

आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2017 (12:14 IST)

गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

सौराष्ट्र, कच्छ भागात उष्णतेची लाट कायम असून, तेथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढले आहे़ गुजरात, पश्चिम राजस्थान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल २२ शहरांचे कमाल तापमान ४० अंशावर नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंशावर स्थिर असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. मुंबईत उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून, आर्द्रतेमध्येही वाढ होत आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गॅस संकटादरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक, अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे कॅबिनेट मंत्र्यांना निर्देश

तैवानला ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 येणार

LIVE: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत एक महत्त्वाचे विधान केले

विद्येच्या मंदिरात रक्तरंजित हल्ला; लग्न करण्यास नकार दिल्याने जुन्नरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला

पुढील लेख
Show comments