suvichar

तळेगावात जनजीवन पूर्वपदावर

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (17:11 IST)
तळेगाव येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर निर्माण झालेला तणाव आता कमी झाला. गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सोबतच संवेदनशील असलेल्या आठ गावांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे गाव सोडून गेलेल्या नागरिकांनी घरी येण्यास सुरुवात केली आहे. मात्र या गावांमधला पोलिस बंदोबस्त अजून काही दिवस कायम ठेवला जाणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली़ आहे. 
 
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर दंगल सदृश्य वातावरण झाले होते. काही घरे, एटीबस आणि खाजगी वाहने जाळण्यात आली होती.  या दंगलीचे लोण हळूहळू शहरासह ग्रामीण भागातही पसरले होते़. त्यानंतर संवेदनशील असलेल्या आठ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना न घडल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण संचारबंदी हटविण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले़ आहे़. 
 
संचारबंदी मागे घेण्यात आल्यामुळे काही दिवसांपासून जवळच्या नातेवाइकांकडे आश्रयासाठी  गेलेल्या नागरिकांनी पुन्हा आपापल्या गावात यायला सुरवात केली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी अशा कुटुंबांची भेट घेऊन प्रशासनाकडून पूर्ण संरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले आहे. काही घरे हल्ल्यात पूर्णपणे उथवस्थ झाली आहेत. सदरच्या घरातील लोकांनी त्यांची आवरासावर सुरू केली आहे. हल्ल्यात नष्ट झालेल्या सामानाची विल्हेवाट, राहिलेल्या साहित्याची आवरासावर करतांना लोक दिसत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

यवतमाळमध्ये बेपत्ता 6 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पोत्यात आढळला, आरोपी ताब्यात

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

अशोक खरात यांच्या अडचणी वाढल्या,100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले

गॅस संकटामुळे मुंबईतील हॉटेल उद्योग अडचणीत, इंडक्शन स्टोव्हची मागणी ३० पटीने वाढली

मालाडमध्ये मुलींवर झालेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला, आरोपींच्या अटकेची मागणी तीव्र

पुढील लेख
Show comments