Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला, तापमानात वाढ

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (10:06 IST)
दिवसा निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे राज्यात सध्या दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.
 
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यात ताापानाचा पारा 30 अंशाच्या पुढे गेले आहे. यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, सांगली, परभणी, पुणे, जळगाव, अमरावती. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्रात 31 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमानाचा पारा समान अंशांवर आहे. कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. तर विदर्भात मात्र 24 फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
राज्यात गेल्या आठवड्यापासून रात्रीच्या किमान तापमानात वाढ सुरू झाली होती. हवामान विभागानुसार किमान तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांत 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 4 अंशांनी वाढले असून मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश भागात किमान तापमान 2 ते 4 अंशांनी वाढले आहे. 
 
मध्य महाराष्ट्रात 31 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. याच विभागात सोलापूर येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३४ अंशांवर आहे. कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. विदर्भात मात्र २४ फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments