Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंदिर कधी उघडणार? दसर्‍यानंतर निर्णय...

Webdunia
रविवार, 12 सप्टेंबर 2021 (20:45 IST)
राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा खुल्या करण्यात आला असला तरी अजूनही मंदिरं आणि सिनेमागृह उघडण्यास परवानगी मिळालेली नाही. मंदिरं उघडण्याचा निर्णय हा दसरा आणि दिवाळीनंतर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
राज्यातील मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील व्यापारी, छोटे उद्योजक, फुल व्यावसायिक, पुजारी इत्यादींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून मंदिरे उघडावीत अशी मागणी राज्य सरकारकडे होत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार यावर कोणताही निर्णय घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
 
आता राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या शंखनाद नंतर मनसेने घंटानाद आंदोलन केले आहे. दरम्यान, कोरोनाचे आकडे कमी झाले आणि कोरोना आटोक्यात आला तर दसरा-दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली होऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.
 
मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. गौरी गणपती सुरू असून आता दसरा आणि दिवाळीचं सण देखील तोंडावर आला आहे. दरम्यान, कोरोनाचे आकडे कमी झाले आणि कोरोना आटोक्यात आला तर दसरा-दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली होऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments